५ वी ते १० वीपर्यंत मराठी विषयाची सक्ती
मुंबई:
इयत्ता पाचवी ते दहावी या इयत्तांसाठी सर्व मंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा द्वितीय सक्तीची करण्यात आली आहे.त्याबाबतचे शुद्धीपत्रक शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले होते. यानुसार शासन निर्णयात सुधारणा करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्वां शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याचा कायदा राज्याने विधिमंडळात संमत केला आहे.
