Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الأحد، 27 نوفمبر 2022

महात्मा ज्योतिबा फुले ,

 महात्मा ज्योतिबा फुले

· प्रारंभिक समाज सुधारक

· सावित्रीबाई को शिक्षा

· मजदूरों के बच्चों की शिक्षा

समाज सुधारक जो अंग्रेजी माध्यम में पाश्चात्य शिक्षा लेकर आगे आए। महात्मा ज्योतिबा गोविंद फुले उनमें से एक थे। अपने समाज के दलितों, शूद्रों और शूद्रों के उद्धार के लिए जीवन भर अथक परिश्रम करने वाले महात्मा ज्योतिबा फुले पहले समाज सुधारक और क्रांतिकारी हैं।

यह कहना गलत नहीं होगा कि ज्योतिबा का जन्म वर्ष 1827 में हुआ था। उनका पैतृक गांव सतारा जिले में कटगुन था और उनका उपनाम गोरहे था। लेकिन गरीबी के कारण ज्योतिब के पिता पुणे आ गए और फूलों का व्यवसाय शुरू किया, इसलिए उनका अंतिम नाम फुले था। ज्योति राव बचपन से ही बहुत बुद्धिमान थे। परिवार की गरीबी से जूझते हुए उन्होंने बड़ी मुश्किल से पढ़ाई की।मराठी की शिक्षा पूरी करने के बाद वे मिशनरियों के अंग्रेजी स्कूल में गए। मिशनरियों के संपर्क में आने के कारण वे अंग्रेजी में पारंगत हो गए।

ज्योतिबा ईसाई प्रचारकों की सेवा, उनके शैक्षिक कार्य और कर्तव्यनिष्ठा से अभिभूत थे। उस समय महिलाओं और अछूतों की स्थिति बहुत खराब थी। उनके लिए शिक्षा के दरवाजे बंद थे। उन्हें समाज में बहुत हीन व्यवहार मिलता था, विधवाओं और तलाकशुदा महिलाओं को बहुत कष्ट होता था। ज्योतिबा ने यह नहीं देखा। ज्योतिबा को लगता था कि महिलाओं के शिक्षित और शिक्षित होने पर ही बहुजन समाज की स्थिति में सुधार होगा। लड़कियों को शिक्षित करने के लिए, ज्योतिब ने 1848 में पुणे में लड़कियों के लिए एक स्कूल खोला। ज्योतिब ने अपनी पत्नी सावित्रीबाई को शिक्षित किया और उन्हें शिक्षक बनाया। यह सोचकर कि यह एक धार्मिक संकट है, उन्होंने जोतिबा और सावित्रीबाई को अत्यधिक यातना दी, लेकिन वे डगमगाए नहीं। ज्योतिब ने 1857 में अछूत बच्चों के लिए एक और स्कूल खोला। वहां मुफ्त शिक्षा शुरू की गई। ज्योतिबा छुआछूत के खिलाफ थे। उन्होंने अछूतों को अपने घर की पानी की टंकी भरने की अनुमति दी।

 उस समय किसानों और मजदूरों की हालत बहुत खराब थी। साहूकार किसानों का तरह-तरह से उत्पीड़न किसानों के अशिक्षित होने के कारण जोतिब ने किसानों के मजदूरों के बच्चों को शिक्षित करना शुरू किया ताकि उन्हें अपनी कृषि उपज का अच्छा मूल्य न मिले। उनके लिए छात्रावास की व्यवस्था की गई।1873 में जोतिब ने 'सत्यशोधक समाज' नामक संस्था की स्थापना की। "सबका मालिक एक है"। भगवान द्वारा बनाए गए सभी पुरुष समान हैं ”। लोक सत्यधर्म ग्रंथ में ये थे इस समाज के सिद्धांत, कल्याणी ने सत्यधर्म की व्याख्या की जो ज्योतिबानी ने नारी शिक्षा के लिए और अछूतों के उत्थान के लिए और उनके लिए उनके मानवाधिकारों को प्राप्त करने के लिए किया। इसलिए लोगों ने उन्हें उनके जीवनकाल में ही सम्मान दिया और उन्हें 'महात्मा' की उपाधि दी। इस महान समाज सुधारक का निधन 27 नवंबर 1890 को हुआ था।

الثلاثاء، 15 نوفمبر 2022

डॉ. सी. व्ही. रामन्

 

नोबेल पुरस्कारप्राप्त भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन्



आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय विज्ञानाचार्य, जगविख्यात 'रामन् इफेक्ट' चे जनक, नोबेल पुरस्काराचे मानकरी सर चंद्रशेखर व्यंकट रामन् यांचा जन्म ७ नोव्हेंबर, १८८८ रोजी त्रिचनापल्ली येथे झाला. या विज्ञानमहर्षीने आपल्या संशोधनाने भारताला जगातला अद्वितीय असा नोबेल पुरस्कार मिळवून दिला. यांचे वडील विज्ञानाचे अध्यापक होते; त्यामुळे घरातील वातावरण विज्ञानाला पोषक होते. रामन् वयाच्या बाराव्या वर्षी मॅट्रिक झाले व मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून ते 'विज्ञान' विषय घेऊन एम.ए. झाले. याच दरम्यान त्यांनी ध्वनिलहरींसंबंधी नवीन संशोधन करून एक निबंध तयार केला व तो लंडनच्या एका मासिकात प्रसिद्ध झाला. काही दिवसांनी त्यांनी 'प्रकाश' या विषयावर एक प्रबंध लिहिला. तो 'नेचर' या इंग्लिश मासिकाने प्रसिद्ध केला. या निबंधामुळे रामन यांना परदेशात कीती मिळाली. परदेशाच्या मान्यतेची ही सुरुवात केली. रामन यांच्या बुद्धीची चमक त्यांच्या प्राध्यापकांच्या लक्षात आली होती. हा विद्यार्थी विलायतेला गेला तर विज्ञानक्षेत्रात मोठे कार्य करील असे त्यांना वाटत होते. त्यांची विलायतेला जाण्याची सगळी व्यवस्था केली होती; परंतु प्रकृतीच्या कारणास्तव ते त्या वेळी परदेशी जाऊ शकले नाहीत. त्यांनी अर्थखात्याची परीक्षा दिली. त्यात ते पहिले आले. मग त्यांनी ठिकठिकाणी नोकऱ्या केल्या. नोकरीत त्यांचे मन रमेना. खर्डेघाशीचा त्यांना कंटाळा आला. शेवटी १९१४ साली रामन् अर्थखात्यातून आपल्या संशोधनकार्याकडे वळले. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी आपले संशोधनकार्य सुरू त्यांच्या संशोधनकार्याचे वृत्तांत प्रसिद्ध होऊ लागताच भारतातील विज्ञानप्रेमी विद्यार्थी कलकत्ता विद्यापीठाकडे ओढले जाऊ लागले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कलकत विद्यापीठाने त्यांना सन्मानाची 'डॉक्टर' ही पदवी दिली

१९२१ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डला शास्त्रज्ञांची परिषद होती. त्या परिषदेला रामन् भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. १९२४ साली कॅनडातही अशीच परिषद होती. त्या परिषदेलाही डॉ. रामन् गेले होते. त्या परिषदांत डॉ. रामन यांनी केलेल्या भाषणान देशोदेशींचे शास्त्रज्ञ अत्यंत प्रभावित झाले. युरोपातून परत येताच डॉ. रामन यांनी नव्या उत्साहाने संशोधनाला सुरुवात केली. भारतातील अनेक विद्यापीठांनी त्यांना व्याख्यानासाठी बोलाविले.

डॉ. रामन यांनी 'प्रकाश' या विषयावर संशोधन केले व त्यांनी जो शोध लावला तो 'रामन परिणाम' (रामन इफेक्ट) म्हणून प्रसिद्ध झाला. १९२८ साली तो सर्वप्रथम भारतीय पदार्थविज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाला. "मर्क्युरी व्हेपर लॅम्पमध्ये मिळणाऱ्या प्रकाशाकडे आपण एखाद्या प्रिझममधून पाहिले तर तो निरनिराळ्या रंगांच्या पट्ट्यांत विभागलेला दिसतो; पण तोच प्रकाश बर्फ किंवा पाणी यामधून जातो त्या वेळी प्रिझममधून दिसणाऱ्या रंगीत पट्ट्यांत आधी न दिसलेल्या प्रकाशरेषा दिसतात.' हाच तो रामन इफेक्ट. डॉ. रामन यांच्या या शोधामुळे जगाच्या ज्ञानभांडारात मोलाची भर पडली.

डॉ. रामन् यांच्या या संशोधनामुळे त्यांच्यावर जगातून स्तुतीचा आणि पारितोषिकांचा अक्षरश: पाऊस पडला. विज्ञानक्षेत्रात भारत श्रेष्ठांच्या मालिकेतील एक ठरला. १९३० चा पदार्थ विज्ञानाचा नोबल पुरस्कार डॉ. रामन् यांना मिळाला. १९३३ साली डॉ. रामन् बंगलोरच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' या संस्थेचे अध्यक्ष झाले. डॉ. रामन् यांच्या प्रेरणेने १९४४ साली 'इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्स' ची स्थापना झाली. जगातल्या अनेक देशांनी त्यांना अनेक सन्मान्य पदव्या दिल्या. १९३५ साली म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना राजसभाभूषण किताब दिला. भारत सरकारने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. सतत संशोधन विषयात रमणारे डॉ. सी. व्ही. रामन २१ नोव्हेंबर, १९७१ रोजी निधन पावले. भारतीय विज्ञानाकाशातील एक तेजस्वी तारा निखळून पडला.




الجمعة، 11 نوفمبر 2022

बालदिन भारताची पहिले पंतप्रधान

 बालदिन, भारताची पहिले पंतप्रधान

पं. जवाहरलाल नेहरू


भारताचे पहिले पंतप्रधान भारतभाग्यविधाते, जागतिक शांततेचे अध्वर्यू, महात्मा गांधीचे कंठमणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मूळ घराणे काश्मीरचे. त्यांचे आडनाव कील. यांचे एक पूर्वज नदीच्या कालव्याच्या काठी राहत होते. हिंदी भाषेत कालव्याला 'नहर' असे म्हणतात. नहरच्या काठी राहणारे ते नेहरू असे त्यांचे आडनाव झाले असे म्हणतात. मोतीलाल नेहरू व त्यांची पत्नी स्वरूपराणी यांना एका साधुपुरुषाच्या आशीर्वादाने एक मुलगा झाला. तोच पुढे जवाहरलाल म्हणून प्रसिद्ध झाला. जवाहरलाल यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. जवाहरलाल लहानपणापासूनच अत्यंत श्रीमंतीत व पाश्चात्य जीवनपद्धतीत वाढले. त्यांच्या आईने मात्र त्यांच्यावर भारतीय विचारांचे संस्कार केले होते.

भारतातच काही शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल १९०५ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे हॅरो, केम्ब्रिज, ट्रिनिटी या शिक्षणसंस्थांत शिक्षण घेतले. या काळात त्यांनी भरपूर वाचन केले; देशोदेशीच्या देशभक्तांची चरित्रे वाचली. आपल्या देशासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. यादरम्यान ते बॅरिस्टरही झाले. १९९२ साली ते भारतात परत आले. अलाहाबादच्या उच्च न्यायालयात ते वकिली करू लागले. लौकरच त्यांचा कमलदेवी कील यांच्याशी विवाह झाला. १७ नोव्हेंबर, १९१७ रोजी त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव इंदिरा प्रियदर्शिनी (हीच पुढे भारताची पंतप्रधान झाली). लखनीच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांची म. गांधींशी भेट झाली. गांधीजींच्या विचारांचा जवाहरलाल यांच्यावर मोठा प्रभाव पडला. राजकारणात गांधीजींच्याच मार्गाने जायचे असे त्यांनी ठरविले. सत्याग्रह, अहिंसा, स्वदेशी, असहकार हे मार्ग वापरून इंग्रजी सत्तेविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात जवाहरलाल सहभागी झाले. १९१९ मध्ये रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी ठरविले.

पं. नेहरू त्या सत्याग्रहात सामील झाले. इंग्लंडचा युवराज भारतात आला. त्याच्या स्वागतावर काँग्रेसने बहिष्कार घातला. त्यासाठी झालेल्या निदर्शनात पं. नेहरूंनी भाग घेतला. त्यात त्यांना सहा महिन्यांची कैदेची शिक्षा झाली. १९२७ साली 'सायमन कमिशन' भारतात आले. काँग्रेसने त्याविरुद्ध लखनी येथे निदर्शने केली. त्यात पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पं. नेहरू जखमी झाले. १९२९ साली लाहोरला काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्याच्या अध्यक्षपदी पं. नेहरूंची निवड झाली. त्याच अधिवेशनात त्यांनी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला व तो मंजूर करून घेतला.

१९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात ९ ऑगस्ट, १९४२ ते २८ मार्च, १९४५ पर्यंत पं. नेहरू अहमदनगरच्या तुरुंगात होते. तेथेच त्यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा भारताच्या इतिहासावरील मोठा ग्रंथ लिहिला.

१५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताचे दोन तुकडे झाले. भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे जन्मास आली. पं. जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. स्वतंत्र भारतापुढे अज्ञान, बेकारी, दुष्काळ, निर्वासित असे अनेक गंभीर प्रश्न होते; परंतु नेहरूंनी या सर्व संकटातून भारताची नौका पुढे नेली; वैज्ञानिक प्रगती, शेती विकास, इत्यादीसाठी अनेक योजना आखल्या.

पं. नेहरू रसिकराज होते. त्यांनी तुरुंगातून लिहिलेली 'इंदिरेस पत्रे' यांतून त्यांच्या कविमनाचा परिचय होतो. त्यांना गुलाबाची फुले खूप आवडत. त्यांच्या रसिकतेचा गुलाब कधीच सुकला नाही. त्यांना लहान मुलांच्या सहवासाचे मोठे वेड होते. जगभर त्यांना 'फुलामुलांचे नेहरू' म्हणून ओळखले जात असे. लहान मुलांचे ते चाचा नेहरू होते; म्हणून त्यांच्या जन्मदिनी १४ नोव्हेंबरला 'बालदिन' साजरा करण्याची प्रथा पडली. ते सलग १८ वर्षे भारताचे पंतप्रधान होते. १९५२ साली त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केल्याने निराश झालेले पं. नेहरू २७ मे, १९६४ रोजी निधन पावले.


الثلاثاء، 1 نوفمبر 2022

विकास अंतरंगाचा

 

विकास अंतरंगाचा

    व्यक्तीच्या जीवन कार्याचा महत्वाचा भाग म्हणजे त्याच्या अंतरंगाचा विकास होय.श्रमाविना संपत्ती, चारित्र्याविना शिक्षण, नितीविना व्यापार, सद्सद्विवेक बुद्धीविना विकास, मानवतेविना विज्ञान यावर १९२४ मध्ये म. गांधींनी विवेचन करून जाणवलेल्या सामाजिक जाणिवांवर अचूकबोट ठेवले.आज बौध्दिकतेचे विलक्षण प्रेम असले तरी पावलोपावली माणुसकी हरवलेले वर्तन माणुसकी अनुभवायला मिळते. यातून वैयक्तिक जीवन आणि राष्ट्र दोन्हींवर दुष्परिणाम झालेले दिसतात. त्यामुळेच बाह्यात्कारी व्यक्तिमत्त्वापेक्षादेखील आपले अंतरंग अत्यंत शुद्ध, स्वच्छ व पारदर्शी असणे गरजेचे आहे. यामुळेच मूल्यशिक्षण हा व्यक्तिमत्त्व विकासातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

मूल्य म्हणजे नैतिक मूल्य. चारित्र्य घडणीसाठी इष्ट वर्तन, तत्त्वे. मूल्ये 'दिसत' नाहीत किंवा 'पाहता' येत नाहीत. व्यक्ती 'काय बोलते', 'कसे बोलते', 'काय करते' यावर त्याचे अनुमान करता येते.

मूल्यांवर नुसती व्याख्याने देऊन भागत नाही.तर कार्य, कृती व आचरणातून ती मुलांच्या संवेदनशील मनावर बिंबवता येतात. मूल्यशिक्षणाची सुरवात घरापासून व कुटुंबात होते. यापुढचे कार्य असते शिक्षणसंस्थेचे. नीतिमूल्ये म्हणजे समाजात, कुटुंबात, परस्परांशी वागण्याचे ठरलेले नियम, असे ढोबळमानाने सांगता येईल. सर्वसाधारणपणे व्यक्ती म्हणून सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, सहानुभूती, संयम, शांत मनोवृत्ती, श्रमनिष्ठा, चिकाटी, नम्रता, प्रयत्नशीलता, सहकार्य, कृतज्ञता, न्याय, बंधुत्व अशा अनेकानेक मूल्यांचा अंगिकार करायला हवा. राष्ट्रविषयक मूल्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान, सर्वधर्मसमभाव, विज्ञाननिष्ठा आदी मानवहितकारक आचारविचारांची जोपासना करायला हवी. ही अशी अनेक मूल्ये महत्त्वाची असली तरी आपल्या दैनंदिन जीवनात सुरवातीला आपण काही मूल्यांचा विशेष विचार करायला हवा.

इच्छा असेल तर मार्ग दिसेल !

 इच्छा असेल, तर मार्ग दिसेल !



        कोणतेही काम करत असताना प्रथम माणसाला त्या कामात आवड व काम करण्याची इच्छा असणे आवश्यक आहे .म्हणजेच इच्छा असेल तरच मार्ग दिसतो.