१०वी व १२वी चा निकाल लागणार ह्या तर्केला
Event | Expected Result Date |
---|---|
Class 10th (SSC) Result Date | 15th May 2025 |
Class 12th (HSC) Result Date | 6th May 2025 |
Time | 1 PM |
एकच ध्यास विध्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास Adarsh Education
१०वी व १२वी चा निकाल लागणार ह्या तर्केला
Event | Expected Result Date |
---|---|
Class 10th (SSC) Result Date | 15th May 2025 |
Class 12th (HSC) Result Date | 6th May 2025 |
Time | 1 PM |
SQAAF लिंक भरनेस मुदतवाढ
SQAAF संपूर्ण माहिती पहानेसाठी वरील बटन क्लिक करा
मुदतवाढ
1) NPS/DCPS खाते नसणाऱ्या मयत कर्मचाऱ्यांनाही फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी लागू.
याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारे सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आलेला होता, त्याला यश प्राप्त झाले आहे.. त्यामुळे खाते नसलेल्या मयत कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला आहे..
2) 31 मार्च 2024 शासन निर्णयानुसार ज्यांनी विकल्प दिले नव्हते आणि त्यांचा मृत्यू झाला अश्या कर्मचाऱ्यांना BY DEFAULT जुनी पेन्शन योजने अंतर्गत फॅमिली पेन्शन मिळणार..
3) ज्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात फॅमिली पेन्शन साठी पात्र व्यक्ती नसतील ( पत्नी, लहान मुले) कुटुंब नसलेले कर्मचारी अश्या कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशन केलेल्या अन्य फॅमिली मेम्बर/व्यक्तीस उपदान (ग्रॅच्युटी) मिळेल..
4) राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार नाही..
खरं तर जुन्या पेन्शन धारकांना ही राजीनामा दिल्यावर ग्रॅच्युटी मिळत नाही, त्यासाठी 20 वर्ष सेवेनंतर VRS घेणे / सक्तीची सेवानिवृत्ती होणे आवश्यक आहे,
NPS मध्ये स्वेच्छा निवृत्ती हा विषय सध्या तरी नाही, त्यामुळे त्यांना (राजीनामा दिलेल्या NPS धारकांना) ग्रॅच्युटी मिळू शकत नाही.. भविष्यात GPS/UPS अंतर्गत स्वेच्छा निवृत्ती लागू असल्यास अश्या प्रसंगी कदाचित ग्रॅच्युटि मिळू शकते, पण त्याबाबत GPS/UPS चे डिटेल शासन निर्णय आल्यावरच भाष्य करता येईल..
5) मयत कर्मचाऱ्यांचे फॅमिली पेन्शन प्रस्ताव सादर करतांना 31 मार्च 2023 GR मधील नमुना 2 व 3 प्रमाणित करून सादर करावा..
6) ज्यांचे मृत्यू 31 मार्च 2023 पूर्वी झाले आहेत, त्यांच्या बाबतीत फॅमिली पेन्शन प्रस्तावासोबत सानुग्रह अनुदान लाभ घेतला असल्या / नसल्या बाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, तर ज्यांचे मृत्यु 31 मार्च 2023 नंतर झाले आहेत, त्यांच्या बाबत सदर प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, कारण 31 मार्च 2023 नंतर सदर 10 लाख सानुग्रह अनुदान योजना/ gr बंद / रद्द करण्यात आलेली आहे..
7) वरिष्ठ कार्यालयाने महालेखागार कार्यालयाकडे संबंधित मयत कर्मचाऱ्याचा फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी प्रस्ताव पाठवतांना त्यापूर्वी कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्याची कर्मचारी हिस्सा रक्कम व त्यावरील व्याज कुटुंबास अदा करणे व शासन हिस्सा व त्यावरील व्याज शासन खात्यात वर्ग करणे आवश्यक आहे, व त्या रक्कमा अदा केल्याचे प्रमाणपत्र (लेखा शीर्ष सह सविस्तर ) पेन्शन प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
साहित्यप्रकार, टोपणनाव व सामान्यज्ञान
*#1. काही साहित्यिक , साहित्यिकांची टोपणनाव#*
(1) कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
(2) राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज, बाळकराम
(3) वि. वा. शिरवाडकर - कुसुमायज
(4) त्र्यंबक बापूजी ठोमरे - बालकवी
15) शंकर केशव कानेरकर - गिरीश
(6) प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
(7) आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
(3) दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
(9) काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
[10] विनायक जनार्दन करंदीकर - विनायक
(13) मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत
(14) दत्तात्रय कोंडी घाटे - दत्त
(18) नारायण मुरलीधर गुप्ते - बी
(10) चिंतामण अंत्रक खानोलकर - आरती प्रभू
(17) शंकर काशिनाथ गर्गे ,- (नाट्यछटाकार ) दिवाकर
(18) गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
(19) माधव शेवक पटवर्धन - माधव जुलियन
(20) ना. धो. महानोर - रानकवी,
(21) माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
(22) दगडू मारोती पवार - दया पवार
(12) यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत
(23) धोंडो वासुदेव गद्रे - काव्यविहारी
(12) नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
(24) जयवंत दळवी - ठणठणपाळ
#2. काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी #
(1) भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) - संत ज्ञानेश्वर
(2) अभंगगाथा-संत तुकाराम
(3) नलदमयंती स्वयंवराख्यान - रघुनाथपंडित
(4 ) भावार्थ रामायण- संत एकनाथ
(5) दासबोध व मनाचे श्लोक - समर्थ रामदास
(5) केकावली-मोरोपंत
(7) गीत रामायण- ग. दि. माडगूळकर
(8) यथार्थदिपिका-वामनपंडित
(9) बिजली - वसंत बापट
(10) शीळ-ना. घ. देशपांडे
(11) ज्वाला आणि फुले -- बाबा आमटे
(12) स्वेदगंगा-विंदा करंदीकर,
3. काही नाटके व त्यांचे नाटककार
1) शारदा - गोविंद बल्लाळ देवल
(5) साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी - प्र. के. अत्रे
(2) सौपद्र-बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
3) कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, विदधाहरण - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
(6) टिळक आणि आगरकर-विश्राम बेडेकर
(7) नट सम्राट - वि. वा. शिरवाडकर
14) प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन-
राम गणेश गडकरी
रक्तदान दिन 1 ऑक्टोबर
विज्ञानाचे आकाशाला गवसणी घालण्याएवढी प्रगती केली आहे. तरीसुद्धा आजपर्यंत मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. अपघात घडल्यानंतर शरीरातले बरेचसे रक्त वाहून जाते. गंभीर शस्त्रक्रियांवेळीही रक्तस्त्रावाने रुग्ण मृत्युमुखी पडतो, गरोदर स्त्रियांना प्रसूतीवेळीही रक्ताची गरज भासते. थॅलेसेमिया तर रक्ताची निर्मितीच थांबते अशा वेळी चार आठवड्यापर्यंत रक्त मिळाले नाही तर रोगी दगावतो. शिवाय अॅनिमिया (पंडुरोग), कावीळ इ. गंभीर प्रकारच्या आजारांसाठीही बाह्य रक्त देण्याची गरज पडते. म्हणूनच रक्त म्हणजे संजीवनी आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
सर्वसाधारणपणे मानवाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते, रक्तदानावेळी ३५० मि.ली. एवढे एकावेळी घेतले जाते. छत्तीस तासात नैसर्गिकरित्या पुन्हा शरीर रक्त भरून काढते. रक्तदानानंतर मनुष्य कामावर जाऊ शकतो.
पुन्हा दर तीन महिन्यांनी तो रक्तदान करू शकतो. सामान्यपणे ज्याला गंभीर आजार नाही किंवा काही विशिष्ट आजाराचा
इतिहास नाही अशी कुणीही प्रौढ व्यक्ती रक्त देऊ शकते. १८ ते ६९ वर्षे वयोगटातील व किमान ४५ किलो वजनाची व्यक्ती रक्तदान करण्यास पात्र ठरते. त्यापूर्वी त्या व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास जाणून शारीरिक तपासणी केली जाते. रक्ताच्या या पराधन (ब्लड डोनेशन) क्रियेत निकोप व्यक्तींचे रक्त गरजू व्यक्तीच्या रक्तप्रवाहात सोडले जाते. तरीही कोणाचेही रक्त कोणाला चालते असे नाही त्यासाठी रक्तगट जुळावे लागतात.
'कार्ल लैंडस्टायनर' या जीवरसायन शास्त्रज्ञाने अनेक व्यक्तींच्या रक्ताचा अभ्यास करून असे दाखवून दिले की विविध व्यक्तींचे रक्त, जीवनद्रव्यात आणि लोहित कणांवर असणाऱ्या काही पदार्थामुळे वेगळे असते. पुढे झालेल्या अभ्यासाने चार प्रमुख रक्तगट मान्य झाले ते म्हणजे ए, बी, एबी आणि ओ. म्हणून रक्तदानाच्या क्रियेवेळी दाता आणि ग्राहक यांच्या रक्तगटाची तपासणी अत्यंत गरजेची ठरली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजात आपल्याला व्यावसायिक रहदाते पुष्कळ आढळतात, त्यांचे रक्त स्वीकारताना ते एच. आय. व्ही. विरहित असल्याची खात्री करून घ्यावी नाही तर तसे रक्त स्वीकारणाऱ्याला एड्सची लागण होऊ शकते.
रक्ताला पर्याय नाही. ते निर्माण करता येत नाही. पैसा त्याची जागा घेऊ शकत नाही. रक्ताचा स्रोत केवळ बारवच आहे, रक्तदान निरुपद्रवी आहे. रक्त हे नाशवंत आहे. दानातून प्राप्त झालेल्या साठ्याची रक्तपेढ्यांमध्ये काळजी घ्यावी लागते. आपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळते ही कल्पनाच आनंददायी आहे. रक्तदान हे सामाजिक काण आहे म्हणूनच असंख्य रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदानास तयार व्हावे व पुण्यकर्म साधावे. जनतेस रक्तदानाची महाली पटाची म्हणून रक्तदान दिन साजरा केला जातो. युवक, कामगार, वसाहती, शासकीय कार्यालये, महिलामंडळे, सामाजिक संस्था, महाविद्यालये यांच्या सहकार्याने स्वैच्छिक रक्तदान मोहीम यशस्वी करून राज्यास रक्तसंकलनाबाबत स्वयपूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. आपणही आपल्या वाढदिवशी किंवा राष्ट्रीय सणादिवशी वर्षातून एकदा श्री रक्तदान करूया व म्हणूया
करूनी दान रक्ताचे
जोडुया नाते बंधुत्वाचे !