Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday 30 August 2022

शिष्यवृत्ती परीक्षा निवड यादी जाहीर _ NMMS EXAM

   शिष्यवृत्ती परीक्षा निवड यादी जाहीर _ NMMS EXAM

 टच images

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षद यांचे मार्फत दिनांक १९/०६/२०२२ रोजी घेण्यात 

आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती  योजना 

(NMMS)परीक्षेची निवडयादी परिषदेच्या           https://nmmsmsce.in/       व      https://www.mscepune.in/

 या संकेतस्थळावर दि.२९/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल .NMMS परीक्षा 

जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी खालील लॉगिनवर देण्यात

 आली आहे .आपले नाव व शाळापाहणेसाठी 👇👇👇👇👇👇👇👇




कोल्हापूर जिल्हा यादी पहा 👇👇👇👇👇👇


येथे पहा रिझल्ट 👇👇👇👇👇👇👇👇👇


Friday 19 August 2022

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२२

 

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२२ अंतिम उत्तरसुची 




येथे पाहू शकता उत्तरसुची 👇👇👇👇

इयत्ता 8 वी  पेपर 1 मराठी माध्यम

पेपर 2 
इयत्ता 5 वी मराठी माध्यम  पेपर 1 



class 8th English midiym  Pepar  1 




class 5th English midiym paper 1 
               paper  2 




Wednesday 17 August 2022

मोबाईल श्राप की वरदान

 

मोबाईल     श्राप की वरदान मराठी निबंध। mobile shap ki vardan nibandh


आज संपूर्ण मानवजातच जगात  मोबाईल शिवाय अपूर्ण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . मनुष्याद्वारे केलेल्या शोधामध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आज एकविसाव्या शतकात मनुष्य मोबाईल शिवाय राहू शकत नाही. एक दिवस अन्ना वाचून राहू शकेल पण मोबाईल नसेल तर त्याचा जीव कासावीस होईल .त्याची चिडचिड वाढलेली पहावयास मिळेल.आज अपवाद वगळता प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात मोबाईलच्या अलार्मने होते. व्यवसाय किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहणे मोबाईल मुळे सोपे झाले आहे. आजकाल तरुणांमध्ये मोबाईल चे चलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा महत्वाच्या भाग बनला आहे. बाजारात देखील मोबाईलचे वेगवेगळी विशेषता असणारे मॉडेल उपलब्ध आहेत आणि तरुणांमध्ये नवीन नवीन मॉडेल घेण्याचा क्रेझ वाढत आहे.

Saturday 13 August 2022

भारतीय तिरंगा इतिहास ,तीन रंगाचे महत्व ,तिरंगा कधी बनवला

 

भारतीय तिरंगा इतिहास




महत्वाचे मुद्दे -
1.भारतीय तिरंगा इतिहास                              2.रंगांचे महत्त्व 

3.तिरंगा बनवणे                                                             4.तिरंग्याचा विकास   

5.समितीची रचना                                                      6.पहिला ध्वज ,दुसरा ध्वज,तिसरा ध्वज

7.तिरंग्याचा योग्य वापर                                 8.तिरंग्याचा आदर

9.तिरंगा नियम

       भारतीय तिरंगा इतिहास       

तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे, जो तीन रंगांनी बनलेला आहे, म्हणून 'तिरंगा' हे नाव आहे. तिरंग्याच्या शीर्षस्थानी गडद भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा समान प्रमाणात आहे. याला सोप्या भाषेत ध्वज असेही म्हणतात. ध्वजाच्या रुंदी आणि लांबीचे गुणोत्तर 2:3 आहे. पांढर्‍या पट्ट्याच्या मध्यभागी एक गडद निळे चाक आहे, ज्याचा आकार अशोकाची राजधानी सारनाथ येथे बसवलेल्या सिंहाच्या डोक्याच्या वर्तुळात दिसल्यासारखा आहे. वर्तुळाचा घेर साधारणपणे पांढऱ्या पट्टीच्या रुंदीएवढा असतो. चक्रात 24 प्रवक्ते आहेत. 22 जुलै 1947 रोजी भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वज स्वीकारला.

Friday 12 August 2022

Nmms Exam Result 2022

शाळेचा निकाल पाहणेसाठी येथे क्लिक करा  click here 


 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दि. १९/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दि. १०/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.

NMMS

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2021-22)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०२१-२२)


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-2022
गुणयादी बाबत सूचना…..
१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. १०/०८/२०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती / हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या इमेलवर दि. २२/०८/२०२२ पर्यंत कळविण्यात यावे. विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांच्या नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील.
३) प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
४) सदर विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गूण मिळणे आवश्यक आहेत.
Enter correct seat no. & mother name  



Thursday 11 August 2022

NMMS Exaim Results 2022

 NMMS Exaim Results 

 आपला निकाल पहाणेसाठी  खालील लिंकला क्लिक करा .



Wednesday 10 August 2022

सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र

    नेताजी सुभाषचंद्र बोस 

   सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र  

    भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व पराक्रम करून इतिहासात अजरामर झालेल्या सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र रोमहर्षक, अद्भुत व नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. सुभाषचंद्रांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी कटकला झाला. जानकीनाथ व प्रभावती देवी हे त्यांचे आईवडील. त्या वेळी आपला देश पारतंत्र्यात होता. ब्रिटिश सरकारच्या अन्यायी जुलमाच्या बातम्या ऐकून सुभाषचंद्र अस्वस्थ होत असत. १९१३ साली ते मॅट्रिक परीक्षा दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९१९ साली ते बी.ए. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी कॉलेजच्या यू. टी. सी. पथकात प्रवेश करून सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरविले. आय. सी. एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले व १९२० साली ती परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन भारतात परत आले व ब्रिटिशांची नोकरी करू लागले. तथापि, जालियनवाला बागेसारख्या क्रूर कत्तली करणाऱ्या जुलमी इंग्रजांची नोकरी

Tuesday 9 August 2022

महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी

 महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी



महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत म्हणजे सत्पुरुष आहेत .  संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच   समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत.या पवित्र भूमीतील महाराष्ट्रात सर्व संतांना प्रिय असलेले पवित्र निर्मळ तिर्थक्षेत्र म्हणजे पंढरी. पंढरी म्हणजे संतांचे माहेर घर. परंतु अनेक तीर्थक्षेत्रांपैकी संतांनी पंढरीलाच आपले माहेर घर का म्हणाले?

सकळ देवांचे माहेर । सकळ संतांचे निजमंदिर। ते हे पंढरपूर जाणावे ।।

Sunday 7 August 2022

भारत व ब्राझील दहावी

 भारत व ब्राझील  Gk 



राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन (Rakhi Purnima Marathi)

 

राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन (Rakhi Purnima Marathi)



रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते.

राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन (Rakhi Purnima Marathi) हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे. या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल असते की, या सणाला नेमकी कशी सुरुवात झाली. रक्षाबंधन माहिती नेमकी (Raksha Bandhan Chi Mahiti) काय आहे? त्याचा इतिहास काय आहे? याचे नक्की काय महत्त्व आहे जाणून घेऊया. राखी पौर्णिमा मराठी माहिती (Raksha Bandhan Mahiti In Marathi) खास तुमच्यासाठी.

Friday 5 August 2022

15 ऑगस्ट मराठी भाषण Independence Day Speech

 

Independence Day Speech 15 ऑगस्ट मराठी भाषण




मंगल पांडे नावाच्या क्रांतिकारकाला ब्रिटीश राजवटीत एका ब्रिटिश अधिकाऱ्याने गोळ्या घातल्यापासून स्वातंत्र्य लढा सुरू झाला. तेव्हापासून भारतभर देशवासीयांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला. आपल्याला आणि आपल्या देशाला हे स्वातंत्र्य इंग्रजांकडून इतक्या सहजासहजी मिळालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, बाळ गंगाधर टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्यता टिळक, लाला लजपत राय आणि खुदीराम बोस इत्यादी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली आणि काही वेळा त्यांना तुरुंगात जावे लागले. पण त्याने हार मानली नाही. कारण भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते आणि अनेक अत्याचार आणि संघर्ष सहन केल्यानंतर ते यशस्वी झाले.

Monday 1 August 2022

Simple present tense - साधा वर्तमान काळ

 

Simple present tense - साधा वर्तमान काळ


अ.न.

Simple present tense - साधा वर्तमान काळ :

मराठीत

1

I read a Story-book

मी गोष्टीचे पुस्तक वाचतो.

2

We read a Story-book.

आम्ही गोष्टीचे पुस्तक वाचतो

3

You read a Story-book.

तू गोष्टीचे पुस्तक वाचतोस.

4

You read a Story-book.

तुम्ही गोष्टीचे पुस्तक वाचता

5

He reads a Story-book.

तो गोष्टीचे पुस्तक वाचतो.

6

She reads a Story-book.

ती गोष्टीचे पुस्तक वाचते.

7

It reads a Story-book.

ते गोष्टीचे पुस्तक वाचते.

8

They read a Story-book.

ते गोष्टीचे पुस्तक वाचतात.

9

I play football.

मी फुटबॉल खेळतोस.

10

We play Kho Khó

आम्ही खो-खो खेळतो.

11

You play Kabaddi.

तू कबड्डी खेळतोस

12

You play tip-cat.

तुम्ही विटीदांडू खेळता.

13

He plays hide and seek.

तो लपाछपी खेळतो.

14

She plays tennis.

ती टेनिस खेळते.

15

It plays carrom.

ते कॅरम खेळतात.

16

They play basketball.

ते बास्केटबॉल खेळतात.

17

Raju and Krushna write a letter.

राजू आणि कृष्णा पत्र लिहितात

18

My father eats a mango.

 माझे वडील आंबा खातात.

19

Lalita sings a song.

ललिता गाणे गाते.

20

We draw pictures.

आम्ही चित्रे काढतो..

21

Radhika and Sonali catch a cat.

राधिका आणि सोनाली मांजर पकडतात.

22

Our teacher teaches us English.

आमचे शिक्षक आम्हाला इंग्रजी शिकवतात.

23

They go to school every day

ते दररोज शाळेला जातात..

24

Sadashiv makes a water clock.

सदाशिव पाण्यावरचे घड्याळ तयार करतो.

25

You go to market by bus.

तुम्ही बसने बाजाराला जा.

26

A parrot flies in the sky.

पोपट आकाशात उडतो.

27

Two ducks swim in the pond.

दोन बदके तळ्यात पोहतात.

28

Priya throws a ball to me.

प्रिया माझ्याकडे चेंडू फेकते.

29

Monika and Deepa write letters with their pens.

मोनिका आणि दीपा त्यांच्या पेनांनी पत्रे लिहित आहेत.

 

Video link  -  click here