नेताजी सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व पराक्रम करून इतिहासात अजरामर झालेल्या सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र रोमहर्षक, अद्भुत व नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. सुभाषचंद्रांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी कटकला झाला. जानकीनाथ व प्रभावती देवी हे त्यांचे आईवडील. त्या वेळी आपला देश पारतंत्र्यात होता. ब्रिटिश सरकारच्या अन्यायी जुलमाच्या बातम्या ऐकून सुभाषचंद्र अस्वस्थ होत असत. १९१३ साली ते मॅट्रिक परीक्षा दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९१९ साली ते बी.ए. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी कॉलेजच्या यू. टी. सी. पथकात प्रवेश करून सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरविले. आय. सी. एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले व १९२० साली ती परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन भारतात परत आले व ब्रिटिशांची नोकरी करू लागले. तथापि, जालियनवाला बागेसारख्या क्रूर कत्तली करणाऱ्या जुलमी इंग्रजांची नोकरी
